Thursday 14 November 2013

Sports Reality



खोला बॉक्सनिकला सामोसा

काही दिवसांपूर्वी एका क्रीडा पुरस्काराला जाण्याचा योग आला. हा कार्यक्रम शहरापासून जरा दुर होता. पुरस्कारार्थी सगळे पंधरा वर्षाच्या आतील म्हणजे पहिली ते नववी पर्यंतचे मुल-मुली त्यात होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी बारा वाजताची होती. आपल्याकडे लग्नाला जायच म्हटलं कि लोक थोड उशिरा जातात, कारण असतं कि भारतात लग्न कधी वेळेवर सुरु होत नाहीत. परंतु, शाळेत भेट द्यायला कुणी 'मोठा व्यक्ती' येणार असेल तर मुलांना किमान एक-दोन तास तरी वेळेच्या आधी बोलावून घेतात. या कार्यक्रमाचं देखील असंच झालं. कुणी मंत्री संत्री येणार होते ज्यांचा हस्ते मुलांना पुरस्कार दिले जाणार होते. बारा वाजताच्या कार्यक्रमाला या मुलांना दहा वाजताच आणून बसवलं  होतं. 

क्रीडा विश्वात खेळाडू काय काय कामगिरी करतात हे सामान्य लोकांना कधीच कळत नाही. बिग बॉस मध्ये एक गेम अशी होती कि त्यामध्ये घरातील सदस्यांना स्वतःच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवरून स्वतःला पॉईण्ट्स द्यायचे होते. यामध्ये संग्राम सिंग हा खेळाडू असून त्याने काय कामगिरी केली हे घरातील सदस्यांना काय दर्शकांना देखील माहित नव्हते पण जेव्हा सलमान खानने शनिवारचा भागात त्याची कामगिरी सांगितली तेव्हा सर्वचजन थक्क झाले. भारतात फक्त काही ठराविक खेळाडूच सामान्य लोकांच्या ओळखीचे आहेत उदा. सचिन, धोनी, विराट  म्हणजेच जे क्रिकेट मध्ये आहेत फक्त तेच … बाकी खेळाडू कोणाच्या खिजगणतीत देखील नाही. 

माझी एक मैत्रीण अथलेटीक्स मध्ये होती,  ती सांगायची तिचा प्रक्टिससाठी होणारा खर्च आणि तिला मिळणाऱ्या  पुरस्काराची रक्कम म्हणजे "चार आण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला" अशी तर्हा होती. आजच्या कार्यक्रमात देखील असच काहीसं झालं होतं एक वाजत आला होता तरी कार्यक्रम सुरु झाला नव्हता. सकाळी दहा वाजता येउन बसलेली मुलं दुपारी एक वाजेपर्यंत भुकेनं तळमळत बसली हो. शेवटी मंत्रीमहोदय तर आलेच नाही पण जे कोणी प्रमुख? पाहुणे आले होते त्यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम सव्वाला सुरु झाला. मुलांचे त्या कार्यक्रमात लक्ष पण नव्हते त्यांचं लक्ष होतं इथून बाहेर कसं पडता येईल आणि काहीतरी कसं खाता येईल. कसाबसा तो कार्यक्रम  दिमाखात? पार पडला. गेटजवळ मिठाईचे बॉक्स वाटप सुरु होतं. सगळी मुलं तिकडे तुटून पडली. आम्ही तिथेच बसलेलो होतो. एका साईडला  मिठाई वाटप आणि दुसऱ्या  बाजूला बुफेची मांडणी चालली होती. मुलांना एकेक बॉक्स देऊन त्यांची रवानगी केली.  इतका वेळ आम्हाला वाटलं कि बुफे या मुलांसाठीच आहे परंतु तो फक्त मंत्री आणि इतर पाहुण्यांसाठी होता. तो  बॉक्स मिळवण्यासाठी मुलं भांडत बसली होती. वाटप करणारा मधेच मुलांवर ओरडत होता, त्यांना ढकलत होता.  एकदाचे ते  मिठाई वाटप संपले. काही मुलं उशिरा आली त्यांना पकडून आणून त्या वाटप करणार्याने बॉक्स त्यांच्या हातात दिले आणि म्हणाला "खा रे!! खेळाडूंनी खायचं असतं दणकून(मला तिथे जाऊन त्याला दोन दणकून द्याव्यास्या वाटल्या, पण त्यात त्याचा काही दोष नव्हता)!! खा रे! ! खा! !एवढेसे खाल्यावर कसं परफॉर्म करणारप्रत्येकाला उत्सुकता होती या रंगबिरंगी बॉक्स  मध्ये काय असेल?? सभागृहाच्या बाहेरच्या कट्ट्यावर मुले बॉक्स खोलून खात बसली होती. त्यात काय होते तर दोन सामोसे, एक लाडू, एक फ्रुटी? सकाळपासून उपाशी असलेल्या मुलांसाठी(भावी खेळाडूंसाठी) फक्त एक  मिठाईचा बॉक्स? दुसर्याच बाजूला काही पाहुणे होते ज्यांना काही खाण्याची देखील इच्छा नव्हती तरी त्यांना जबरदस्तीने बॉक्स दिले जात होते आणि वरती जेवणाचे आमंत्रण देखील दिले जात होते. 

आपल्या देशात ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्यांना काही दिले जात नाही आणि जे खाऊन-पिऊन सुखी असतात त्यांनाच खाण्याचा आग्रह केला जातो. इतर देशात खेळाडूना चांगले खाणे आणि प्रशिक्षणहि दिले जाते त्यामुळे त्यांच्याकडे पदकांची संख्या वाढतच जाते.  ती मुले त्या एका बॉक्स वर खुश झाली, पण खेळाडूंना असंच खाणं मिळत राहिलं तर तुम्ही त्यांचाकडून पदकं मिळवण्याची अपेक्षा कशी करू शकता ???

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...