Sunday 30 June 2013

Monsoon Memories


 
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे ...

शाळेत असताना 'पावसाळा' या विषयावर निबंध लिहिताना मी नेहमी बाल कवींच्या कवितेतील या ओळींनी निबंधाची सुरुवात करायचे. पाऊस ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस 'एन्जॉय' करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो आला की सगळेच आनंदुन जातात. पुर्वी लहान मुले पावसात होड्या सोडत बसायचे पण सध्या होड्या कमी दिसायला लागल्या; मुले व्हिडिओ गेमच खेळताना दिसायला लागले. 

पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. कोणत्या गोष्टीला कोणत्या 'उपमे'च्या डब्ब्यात टाकतील ते सांगता येत नाही. आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार 'युनिक' फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात. 

प्रत्येकाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि मांडण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी सामान्य लोकांना भुरळ पाडणारी नक्कीच असते. हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. कोणताही कवी निसर्ग नुसताच अनुभवत नाही किंवा त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद घेत नाही तर तो जीवनाच्या व्यापकतेचा शोध घेत असतो. 

कवी-कवयित्रीच्या भावना शांता शेळके यांच्या या कवितेतून दिसतात.....
झाडांवरी मुके, पाखरांचे थवेवीज लालनिळी, कशी नाचे लवेतेजाळते उभ्या अवकाशांत ग.
वीज कडाडतां, भय दाटे उरींएकलि मी इथे, सखा राहे दुरीमन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग. 

पावसाळ्याची चाहूल लागली की ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी स्थळे शोधायला सुरुवात करतात. ट्रेकर लोक सिंहगड ते सह्याद्रीच्या सर्व रांगा  तसेच छोटी मोठी जंगले, विविध घाट शोधुन शोधुन फिरत बसतात. पावसाळ्यातला प्रत्येक वीकएन्ड कुठल्या ना कुठल्या तरी गडावर ही मंडळी साजरा करतात. यातच भर पडते ती प्रेमवीरांची; ट्रेकर्स सारखी ही मंडळी देखील ठिकाणे शोधत बसतात. एकाच छ्त्रीखाली फिरत पावसाचा आनंद घेताना दिसतात. पावसात एकत्र आईसक्रीम, एखाद्या गडावर मक्याचे कणीस, खेकडा भजी, सीसीडी मध्ये गरमागरम कॉफी यांचा आस्वाद घेताना दिसतात. हेल्मेट न घालता, स्कार्फ न बांधता, रेनकोट न घालता बाईक ची राईड  म्हणजे अफलातूनच!

ऑफिस सुटल्यावर बाईकवरून घरी जाणारी मंडळी पावसात मुद्दामच अमृततुल्यचा अनुभव घेताना दिसतात; सोबतच असतात गरमागरम भजी, सामोसा, चाट! अशा चहाच्या एका कपाने दिवसभरचे सगळे टेन्शन पळून जाते. नुसत्या नावाने आणि वासानेच खायची -प्यायची इच्छा होते. 

पावसाळ्यात सगळ्यात जास्त भाव खायला लागतात ती मंडळी म्हणजे मजनू-देवदास,  हृदय तुटलेली, 'तनहा दिल' लोक. जी उगीचच आपल्याला खूप दुःख झालय आणि या जगात आपल्याला शायरी करण्यापलिकडे काहिच उरला नाहीये अस वागतात. 

जसे कि माझ्यासारखे लोक ...

ये थन्डि हवा, ये हसीन वादिया, याद कर रहे है तुम्हे|
वो हमारी यादे, मिठी मिठी बाते, और साथ मे बीते हुये खास लम्हे || ❤❤❤

कुणी काही म्हणू, कुणी काही बोलू, पण प्रत्येक जण पाऊस एन्जॉय करतो तोही आपापल्या आगळ्या वेगळ्या रंगात आणि ढन्गात!!!

***


Thursday 27 June 2013

You- Me- and Rain

तू मी अन् पाऊस ...
 
आज तुझी आठवण यायला लागली ख़ुप;
म्हणून भेटायला आले विसरुन सारी तहान भूक,

पाहुन तुला समोर मला झाला आनंद;
पाऊस होता सोबत म्हणून मन झाले बेधुंद,

नकळत माझ्या धरला तु माझा हात;
म्हटला चल खाऊ कणीस एकसाथ,

कणीस ख़ाताना आला जरा तुला लळा;
काकांना म्हटलं  कणसात थोड लिंबू तरी पिळा,

तु, मी, बाईक अन् सोबत होता पाऊस;
म्हणून भिजायची फिटली पुरेपुर हौस,

भिजता भिजता पावसात झाली आपली मस्त 'राईड';
आता रात्री सर्दि, पडशासाठी आई करेल 'गाईड',

असाच पाऊस रोज रोज येऊ दे;
तुझी माझी भेट रोज रोज घडू दे.

***

                        



Sunday 16 June 2013

Break up ...

ब्रेक-अप.....
 
 'जब कोई बात बिगड जाएजब कोई मुश्कील पड जाएतुम देना साथ मेरा ओ हमनवाब
ना कोई हैना कोई थाजिंदगी में तुम्हारे सिवा, ओ हमनवाब'.... 

मी हे गाणं ऐकत होते तेवढ्यात 'तीमला भेटायला आली. पण तेव्हा ती नेहमीप्रमाणे नव्हती. नेहमीप्रमाणे म्हणजे सदा हसतमुखचॅपॅड चॅपॅड गप्पा मारणारीनॉन स्टॉप कुठल्याही विषयावर भाषण देणारीनवीन फिल्म यायच्या आधीच तिच प्रोमोशन करणारीरोज स्वत:विषयी भरभरून बोलणारीआज एकदमच शांत शांत होती. मग खूप विचारल्यावर बोलली 'फाइनली आमच चार वेळा ब्रेकअप-पॅचअप झल्यानंतर आता पुन्हा ब्रेकअप झालं आणि हे आता 'दि एण्डवाल ब्रेक अप झाल..... इत्यादी'. मला थोड्यावेळ असा वाटलं मी 'जब वी मेटमधली 'गीतआहेजी सगळ्यांच 'सॅड'गीत ऐकत असते आणि 'सोल्यूशनदेत बसते. मी तिला सांगून टाकल 'गेला ना सोडून जाउदेत तू चिल मार नाकशाला टेन्शन घ्यायचंमस्त ए जवानी है दिवानी पाहून ये. असा सुतकी चेहरा करून बसलीस ना तर त्याला जास्त आनंद होईल. तू दाखवून देमला माझं आयुष्य आहे आणि ते मी आनंदाने जगनारच!....इत्यादी

मला हा प्रश्न नेहमी पडतोजर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ती आहे तस स्वीकारलेलं असतंतर हा 'ब्रेक-अपनामक कीडा असा कसा या नाजूक नात्यात घुसून त्याला पोकळ करतो. एखाद्या व्यक्तीशी आपण मानसिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या एकत्र आलेलो असताना ही 'ब्रेक-अपची फॅशन का मधे मधे करते. जन्म झाल्यानंतर आपण आईवडिलभाऊबहीण ...  विविध नात्यांनी आपोआपच बांधले जातो. रक्ताची नाती म्हणतात त्याला. या नात्यांप्रमाणेच 'त्याच अन् तिचनातं का होऊ शकत नाहीआई-वडिलांशीभावा-बहिणीशी भांडण झालं की आपण त्यांचाशी ब्रेक-अप तर नाही ना करतमग इथेच का ब्रेक-अप करतात ही लोकरिलेशनशिप  सुरू करताना समोरच्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आवडत असतात(आवडत असल्याचा उगीचच आव आणला जातो). सगळंच सुरुवातीला आलबेल असतं. हळूहळू कळायला लागतंआपल्याच्याने नाही झेपणार समोरची व्यक्ती आणि मग खटके उडतात. भांडण होतात अन् मग ब्रेक-अप होत. समोरच्या व्यक्तीला ती आहे  तसं स्वीकारलं की असलं ब्रेक-अप वगैरेचा पर्यायच  नाही राहत. 

काल अचानक मला 'ती'ची आठवण आली म्हणून तिला फोन केला. इकडची तिकडची हालहवा विचारून झाल्यावरतिनेच सांगायला सुरूवात केली. 'तीआता पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. आणि आत्ताचा 'तोतिला "हवा तसा" (अगदी परफेक्ट) आहे. बरीच खुश होती ती. मी फोन ठेवला. म्हटलं चला खुश आहे ना ती(?) मग ठिके! आणि मी कॉफी बनवत बनवत गुणगुणत बसले .....

'दिल संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू
दिल यहीं रुक जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू!!! ❤❤❤





जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...