Sunday, 30 June 2013

Monsoon Memories


 
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे ...

शाळेत असताना 'पावसाळा' या विषयावर निबंध लिहिताना मी नेहमी बाल कवींच्या कवितेतील या ओळींनी निबंधाची सुरुवात करायचे. पाऊस ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस 'एन्जॉय' करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो आला की सगळेच आनंदुन जातात. पुर्वी लहान मुले पावसात होड्या सोडत बसायचे पण सध्या होड्या कमी दिसायला लागल्या; मुले व्हिडिओ गेमच खेळताना दिसायला लागले. 

पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. कोणत्या गोष्टीला कोणत्या 'उपमे'च्या डब्ब्यात टाकतील ते सांगता येत नाही. आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार 'युनिक' फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात. 

प्रत्येकाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि मांडण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी सामान्य लोकांना भुरळ पाडणारी नक्कीच असते. हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. कोणताही कवी निसर्ग नुसताच अनुभवत नाही किंवा त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद घेत नाही तर तो जीवनाच्या व्यापकतेचा शोध घेत असतो. 

कवी-कवयित्रीच्या भावना शांता शेळके यांच्या या कवितेतून दिसतात.....
झाडांवरी मुके, पाखरांचे थवेवीज लालनिळी, कशी नाचे लवेतेजाळते उभ्या अवकाशांत ग.
वीज कडाडतां, भय दाटे उरींएकलि मी इथे, सखा राहे दुरीमन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग. 

पावसाळ्याची चाहूल लागली की ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी स्थळे शोधायला सुरुवात करतात. ट्रेकर लोक सिंहगड ते सह्याद्रीच्या सर्व रांगा  तसेच छोटी मोठी जंगले, विविध घाट शोधुन शोधुन फिरत बसतात. पावसाळ्यातला प्रत्येक वीकएन्ड कुठल्या ना कुठल्या तरी गडावर ही मंडळी साजरा करतात. यातच भर पडते ती प्रेमवीरांची; ट्रेकर्स सारखी ही मंडळी देखील ठिकाणे शोधत बसतात. एकाच छ्त्रीखाली फिरत पावसाचा आनंद घेताना दिसतात. पावसात एकत्र आईसक्रीम, एखाद्या गडावर मक्याचे कणीस, खेकडा भजी, सीसीडी मध्ये गरमागरम कॉफी यांचा आस्वाद घेताना दिसतात. हेल्मेट न घालता, स्कार्फ न बांधता, रेनकोट न घालता बाईक ची राईड  म्हणजे अफलातूनच!

ऑफिस सुटल्यावर बाईकवरून घरी जाणारी मंडळी पावसात मुद्दामच अमृततुल्यचा अनुभव घेताना दिसतात; सोबतच असतात गरमागरम भजी, सामोसा, चाट! अशा चहाच्या एका कपाने दिवसभरचे सगळे टेन्शन पळून जाते. नुसत्या नावाने आणि वासानेच खायची -प्यायची इच्छा होते. 

पावसाळ्यात सगळ्यात जास्त भाव खायला लागतात ती मंडळी म्हणजे मजनू-देवदास,  हृदय तुटलेली, 'तनहा दिल' लोक. जी उगीचच आपल्याला खूप दुःख झालय आणि या जगात आपल्याला शायरी करण्यापलिकडे काहिच उरला नाहीये अस वागतात. 

जसे कि माझ्यासारखे लोक ...

ये थन्डि हवा, ये हसीन वादिया, याद कर रहे है तुम्हे|
वो हमारी यादे, मिठी मिठी बाते, और साथ मे बीते हुये खास लम्हे || ❤❤❤

कुणी काही म्हणू, कुणी काही बोलू, पण प्रत्येक जण पाऊस एन्जॉय करतो तोही आपापल्या आगळ्या वेगळ्या रंगात आणि ढन्गात!!!

***


2 comments:

Lingya Ghat Waterfall Trek : 'लिंग्या' सुळक्याचा दिमाख अन् कोसळणारा धबधबा; धामणओहोळ परिसरात निसर्गप्रेमींची गर्दी!

सह्याद्रीच्या कुशीतील छुपे सौंदर्य: लवासाजवळील ' लिंग्या घाट धबधबा ट्रेक ' ठरतोय ट्रेकर्सची पहिली पसंती! सह्याद्रीच्या कुशीत दडलेल...